आधुनिकतेकडे एक पाऊल : आमदार विनोद अग्रवाल यांच्या पुढाकाराने 1 कोटी 70 लाखांच्या निधीतून जयस्तंभ चौक बस स्थानकाचा होणार आधुनिक सुशोभीकरण
शहरवासीयांच्या वर्षानुवर्षांच्या मागणीला मिळणार न्याय, सर्व सुविधा असलेले बस स्थानक लवकरच साकार होणार
गोंदिया:शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जयस्तंभ चौकातील बस स्थानक अनेक वर्षांपासून अराजकतेला, अव्यवस्थेला आणि दुर्लक्षाला सामोरे जात होते. येथील जुने बस स्थानक जीर्ण अवस्थेला पोहोचले होते, जेथे दिवसातून अनेक वेळा भटक्या जनावरांचा विळखा आणि सभोवताली पसरणारी अस्वच्छता नागरिकांच्या सहनशक्तीची कसोटी घेत होती. अनेक वर्षांपासून शहरवासीयांची मागणी होती की या अत्यंत गजबजलेल्या चौकात एक आधुनिक आणि सर्व सुविधायुक्त बस स्थानक उभारले जावे.आता या दिशेने ऐतिहासिक पाऊल उचलले जात असून, आमदार विनोद अग्रवाल यांच्या अथक प्रयत्नांमुळे 1 कोटी 70 लाख रुपयांच्या निधीतून जयस्तंभ चौक बस स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. ही केवळ पायाभूत सुविधा प्रकल्प नसून, शहराच्या जीवनमानाला नवे परिमाण देणारे परिवर्तन ठरणार आहे.
नवीन बस स्थानक कसे असेल
नवीन बस स्थानक अत्याधुनिक वास्तुविशारद संकल्पनेसह आणि सर्व नागरी सुविधा असलेल्या स्वरूपात बांधले जाईल. त्यामध्ये यांचा समावेश असेलः
✅ स्वच्छ व सुंदर प्रतीक्षालय
✅ महिलांसाठी, पुरुषांसाठी व दिव्यांगासाठी स्वतंत्र स्वच्छ व सुसज्ज शौचालय
✅ शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा
✅ डिजिटल माहिती फलक
✅ प्रकाश व्यवस्था आणि हरित सौंदर्यीकरण
✅ CCTV निगराणी व सुरक्षा यंत्रणा
आमदार विनोद अग्रवाल यांची प्रतिक्रिया:
हे केवळ एक बस स्थानक नाही, तर गोंदिया शहराच्या शिस्त व अभिमानाचे प्रतीक ठरणार आहे. जनतेला अनेक वर्षांपासून जे त्रास सहन करावे लागत होते, त्या वेदनेचा आता शेवट होणार आहे. आम्ही या परिसराला स्वच्छ, सुरक्षित आणि स्मार्ट बनवणार आहोत.
विनोद अग्रवाल , आमदार गोंदिया
पूर्वीची स्थिती काय होती?
जयस्तंभ चौक येथील बस स्थानक अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत होते. परिसरात चारही बाजूंनी घाण पसरलेली होती. भटक्या जनावरांचा मुक्त संचार चालू होता. प्रवाशांना बसण्यासाठी किंवा थांबण्यासाठी पुरेशी जागा नव्हती. अती व्यस्त वाहतुकीच्या चौकात रस्त्यावरच थांबावे लागत होते, ज्यामुळे अनेकदा अपघातही होत असत. महिलांसाठी आणि अन्य प्रवाशांसाठी शौचालय, पिण्याचे पाणी अशा मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नव्हत्या.सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, हा संपूर्ण परिसर राष्ट्रीय महामार्ग व बाजारपेठेच्या जवळ असल्यामुळे येथे प्रचंड गर्दी आणि वाहतुकीची अराजकता होती.
या सर्व समस्यांचा गांभीर्याने विचार करून आमदार विनोद अग्रवाल यांनी या प्रकल्पाला केवळ मंजुरी मिळवून दिली नाही, तर तातडीने प्रशासकीय मान्यता मिळवून हे काम प्राधान्य यादीत समाविष्ट करून घेतले.
शहरवासीयां मध्ये आनंदाचे वातावरण
शहरातील नागरिक, व्यापारी, वाहनचालक व प्रवासी यांच्यात या निर्णयामुळे आनंदाची लाट उसळली आहे. त्यांनी याला “विकासाच्या दिशेने क्रांतिकारी पाऊल” असे संबोधले आहे.हे केवळ बस स्थानक नाही, तर आमच्या शहराच्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे." — एक व्यापारी
"वर्षानुवर्षांची वाट पाहणे संपले. आमदार साहेबांचे मनःपूर्वक आभार!" — एक महिला प्रवासी

ليست هناك تعليقات:
إرسال تعليق